अकलूज -महाराष्ट्र राज्यातील महामार्गावर महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना देखील टोल मधून सूट देण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात मुख्यमंत्री, मंत्री यांच्या सभा, उद्घाटने, विकास कामे, तसेच इतर राजकीय पक्षाचे मोर्चे, आंदोलने यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे पत्रकारांना महामार्गावर टोल भरावा लागत आहे. तरी मुख्यमंत्री यांनी महामार्गावरील टोलनाक्यावरील टोल मधून पत्रकारांना वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन अप्पर जिल्हाअधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद शेंडगे, भगवान कदम, शहर संघटक डॉ. राजेंद्र शहा, सचिव अरुण सिडगिड्डी, प्रभाकर एडके, वैजिनाथ बिराजदार, शिवलिंग म्हेत्रे, आयुब शेख, कलीम शेख, अल्ताफ शेख, अक्की बबलाद, प्रदीप पेंदापल्लीवार आदी यावेळी उपस्थित होते.