शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी, दररोज निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. आहारात अनेक प्रकारची हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे, पण आपण रोज काय खावे हे जाणून घेण्याऐवजी सध्याच्या काळात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
शरीर निरोगी ठेवायचे असेल तर साखर आणि मीठ या दोन्हींचे सेवन एका विशिष्ट मर्यादेतच करा. मिठाचे अतिसेवन अनेक प्रकारे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. यामुळे, रक्तदाब वाढण्याचा सर्वात मोठा धोका आहे आणि ही स्थिती तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. एवढेच नाही तर अतिरिक्त मीठ तुमच्या हाडांसाठीही हानिकारक ठरू शकते.
कॅल्शियम होते कमी
कॅल्शियम हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी सर्वात आवश्यक मानले जाणारे एक पोषक आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की जर तुम्ही जास्त प्रमाणात मीठ सेवन केले तर ते शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण करू शकते. तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितके जास्त कॅल्शियम तुमच्या शरीरातून काढून टाकले जाईल, याचा अर्थ ते तुमच्या हाडांसाठी देखील खूप हानिकारक आहे. दिवसाला 2,300 मिलीग्रामपेक्षा कमी सोडियम वापरण्याचे लक्ष्य ठेवा.
मीठ हृदयासाठी हानिकारक
रक्तप्रवाहात सोडियमचे प्रमाण वाढल्याने मूत्रपिंडाची पाणी काढून टाकण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो. उच्च रक्तदाबामुळे अखेरीस स्ट्रोक आणि हृदय अपयश यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अतिरिक्त मीठ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड सतत काम करत असल्याने, या स्थितीमुळे मूत्रपिंडाचे आजार देखील होऊ शकतात.
अतिरिक्त सोडियमचे दुष्परिणाम
सोडियम/मीठाचे अतिसेवन अनेक प्रकारे आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकते. त्याचे स्नायू, हाडे आणि इतर अनेक अवयवांवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
1. हृदयाच्या स्नायूंची समस्या
2. डोकेदुखी – किडनी रोग
3. ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडे ठिसूळ होणे
4. हृदयाच्या ठोक्याची समस्या
5. उच्च रक्तदाब
6. मूतखडे
7. पोटाच्या कर्करोगाचा धोका