देहूगाव – बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बुधवारी (दि. 22) सकाळी तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत नतनस्तक झाले.
काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले होते. पुण्यात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला होता. अखेर त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबाबत माफी मागत संत तुकाराम महाराज हे भगवानाचे रूप असल्याचे म्हटले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या बागेश्वर धामचे वीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे अनुयायी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीर्थक्षेत्र देहूमध्ये येत त्यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत या वादावर पडदा टाकला.
दर्शनानंतर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेवून मोठे समाधान वाटले. महाराजांनी तपाच्या जोरावर बुडालेली गाथा इंद्रायणी नदीतून वर काढली. अशी भारतातील संताची महीमा आहे.संतांचा आशिर्वाद लाभल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल.