नवी दिल्ली – छत्रपती संभाजी राजे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आगामी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा केली होती. राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. संभाजी राजेंच्या याला गुगलीनंतर राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देणार याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. अशातच आता राज्याचे विरोधीर पक्ष नेट देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
“छत्रपती संभाजीराजे यांना मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं. आता संभाजीराजेंना भाजपाचा पाठिंबा द्यायचा की नाही याचा राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर निर्णय होईल. त्यामुळे याबाबत जो योग्य निर्णय असेल तो सांगू.” असे उत्तर देत फडणवीस यांनी संभाजी राजेंना पाठिंबा द्यायचा प्रश्न पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला.
भाजपाचे दोन खासदार अगदी स्पष्टपणे निवडून येतात
यावेळी बोलताना फडणवीस यांनी संख्याबळाच्या जोरावर, ‘महाराष्टातून भाजपाचे राज्यसभेत दोन खासदार अगदी स्पष्टपणे निवडून येतात. आमच्याकडे मतं आहेत, आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या संदर्भातील भाजपाचे सर्व निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेऊ’
संजय राऊतांना टोला
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस याणी शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील टोला लगावला. राऊत यांनी ज्ञानवापी मशीद प्रकरण हे भाजपाची २०२४ लोकसभा निवडणुकांची तयारी असल्याचं म्हंटल होत. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी, भाजप राऊतांना महत्व देत नाही असे सांगितले.
“ज्ञानवापीच्या राजकीय परिणामांचा आम्ही विचार करत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेचा विषय राजकारणाच्या पलिकडील असतात.” असे देखील फडणवीस यांनी सांगितले.