मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे चारही आरोपींना पाच दिवासांची कोठडी वाढवून दिली आहे. त्यामुळे 16 एप्रिलपर्यंत सीबीआयच्या ताब्यात असणार आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने निर्णय दिला. देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सीबीआय करत आहे.
अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नाहीत. ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचीही कस्टडी वाढवून हवी असा युक्तीवाद सीबीआयने कोर्टात केला आहे. यावर देशमुख यांचे ज्येष्ठ वकील विक्रम चौधरीं यांनी युक्तिवाद केला.
चौकशी दरम्यान शांत राहण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. उत्तरं देत नाहीत म्हणून रिमांड वाढवून द्या, ही मागणी अयोग्य आहे. त्यांचं वय वाढलेलं आहे, त्यांना विविध आजार आहेत. त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. या गोष्टींचा विचार करायला हवा, असा युक्तवाद विक्रम चौधरी यांनी केला. तसेच सीबीआयच्या कार्यपद्धतीवर सवालही उपस्थित करण्यात आला.
संजीव पालांडे यांना टॉयलेट बाहेर तासंतास बसवून ठेवल जाते. कोर्टाने सीबाआय कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासावे, असा युक्तीवाद संजीव पालांडेंचे वकील शेखर जगताप यांनी केला. देशमुखांचे खासगी सचिव या नात्याने कुंदन शिंदेंविरोधात कोणताही थेट आरोप नाही. शिंदे तपासांत पूर्ण सहकार्य करत असल्याचा युक्तीवाद करत कोठडी वाढवून देण्याला विरोध केला. मात्र सचिन वाझे यांच्या वकिलांनी आरोपींची कस्टडी वाढवून देण्याचे समर्थन केले.