पुणे- चार चाकी वाहनाच्या लायसन साठी नूतनीकरणाच्या वेळी रिफ्रेशर कोर्स सुरु करण्याची मागणी नितीन गडकरी (रस्ते व महामार्ग मंत्री व रस्ते व महामार्ग मंत्रालय), अनिल परब (परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य) आणि डॉ अविनाश ढाकणे (परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे.
घाटोळे यांनी दिलेल्या माहितीनूसार मोटार वाहन कायद्यानुसार वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर अर्जदाराला चार चाकी वाहनांसाठी लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज करण्यात येतो. पक्या चार चाकी लायसन नूतनीकरणाची मुदत लायसन काढल्यापासून 22 वर्षा साठी मिळते . अर्जदारांनी लायसन काढल्यापासून तो चार चाकी वाहन चालवत आहे का ? तसेच 22 वर्षानंतर त्याच्या दृष्टीमध्ये काही दोष निर्माण झाला आहे का ? तसेच तो कुशलपणे चार चाकी वाहन चालू शकतो का ? बदललेल्या वाहतुकीच्या नियमांची त्याला माहिती आहे का ? इंधन बचतीबाबत च्या आवश्यक टिप्स त्याला माहिती आहेत का ? या सर्व गोष्टी बाबत पुनर उजळणी करणे आवश्यक आहे.
यामळे चार चाकी वाहनाच्या लायसन्स नूतनीकरण करतेवेळी रिफ्रेशर कोर्स मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था द्वारे मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांद्वारे हा चार चाकी वाहनाचा रिफ्रेशर कोर्स सुरु करावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले अपघात विरहित भारत निर्माण करण्यासाठी रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व कुशल वाहन चालक निर्मितीसाठी अवजड वाहनांसाठी सध्या चालू असलेला रिफ्रेशर कोर्स फॉर्म नंबर 5 ए प्रमाणेच छोट्या चार चाकी वाहनाच्या नूतनीकरणाच्या वेळी अशा प्रकारचा रिफ्रेशर कोर्स सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्था मार्फत सुरू करावा. चार चाकी वाहनाचे लायसन नूतनीकरण करताना असा रिफ्रेशर कोर्स अनिवार्य करावा व शासन मान्य प्रशिक्षण संस्थेतून मोटार ड्रायव्हिंग स्कूल मधून फॉर्म नंबर 5 ए चार चाकी वाहनांसाठी अनिवार्य करावा अशीही मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.
यासंदर्भात असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत यशवंत कुंभार महासचिव विलास आपटे कार्याध्यक्ष सुनिता चौहांन कार्याध्यक्ष अनंत कुंभार (वरिष्ठ उपाध्यक्ष), सुधाकर जाधव (उपाध्यक्ष), भारती पाटील (उपकार्याध्यक्ष), निलेश गांगुर्डे( कोषाध्यक्ष), विवेक खाड(े प्रवक्ता), राजेश कोडगिरे (उपाध्यक्ष ), प्रवीण महांकाळ (उपाध्यक्ष), सुनील मोरे (उपाध्यक्ष), जमील देशपांडे (उपाध्यक्ष), शिवाजी काकडे (सचिव), दीपक रावळ पाटील (सचिव), महेंद्र सोनवणे (सचिव), सुनील चौधरी (विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र) आदी पदाधिकारी उपस्थित होते.