नवी दिल्ली – राजधानी दिल्लीची हवा (Delhi Air) दिवसेंदिवस विषारी होत आहे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर राजधानीच्या जवळील सर्वच राज्यात शेतकरी (Farmer) मोठया प्रमाणात पराली जाळणे सुरु करतात. यामुळे दिल्लीकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात. तसेच त्यांचे आरोग्य देखील धोक्यात येते.
प्रदूषण नियंत्रीत करण्यासाठी केजरीवाल सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत. एकूणच राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांनी नुकतीच एका बैठक आयोजित केली होती. मात्र फारसे यश मिळाले नाही. हवा गुणवत्ता आज 200 ते 300च्या मधात नमूद करण्यात आली आहे. यामुळे नागरिक अनेक आरोग्य समस्याचा सामना करावा लागत आहे. (delhi pollution)
राजधानी नवी दिल्लीचे पर्यावरण मंत्री आणि आम आप नेते गोपाल राय यांनी विविध विभागांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी दिल्लीच्या हवेतील वाढलेल्या प्रदूषणाच्या पातळीबद्दल चर्चा केली. गोपाल राय यांनी यांनी नवी दिल्लीसाठी “रेड लाइट ऑन, इंजिन ऑफ’ हे धोरण जाहीर केले आहे. हे धोरण 26 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. याशिवाय दुचाकींमुळे देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून दुचाकीचालकांनी त्यांच्या वाहनांची पीयूसी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. (Delhi)
दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये पालापाचोळा जाळण्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होणे हे एकमेव कारण नाही, असे केंद्राच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले होते. कारण याचा प्रदूषणातील वाटा केवळ 10 टक्के इतकाच आहे. सध्या दिल्लीत धुळीने होणारे प्रदूषण सर्वाधिक आहे.