मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. त्यांच्या ट्विटमुळे त्या नेहमीच सोशलवर चर्चेत येत असतात. त्यांना सोशलवर त्यांच्या ट्विटमुळे प्रचंड ट्रोलिंगचा समना करावा लागतो.
यातच सध्या राज्यातील राजकीय वातावरण अनेक मुद्यावरून चांगलेच तापले आहे. यावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर काही दिवसांपूर्वी निशाणा साधला होता. त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेवून ठेवला आहे आमचा महाराष्ट्र …. ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट केले.
यावरून टीव्ही वृत्तवाहिनी एबीपी माझ्याच्या एका कार्यक्रमातच्या कार्यक्रमात ट्विट डिलीट केल्याबाबत तसेच सोशल मीडियावरून ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या,“मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून केले. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”, अशा शब्दात त्यांनी ट्रोलर्सला सुनावले आहे.