पुणे – सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात एका वकिलाला सहा वर्षांनी न्यायालयने दोषमुक्त केले आहे. केवळ हरकत घेणे, आपले मुद्दे मांडणे आणि मोठ्याने बोलणे म्हणजे सरकारी कामात अडथळा नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.
ऍड. शाम गोपाळ मुंदडा असे त्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या वतीने न्यायालयात ऍड. सुचित मुदडा यांनी बाजू मांडली.
ऍड. शाम यांच्याविरोधात सार्वजनिक न्यास कार्यालयाचे निरीक्षक बी.टी. पाचरणे यांनी फरासखाना पोलिसात फिर्याद दिली होती. पुण्यातील रविवार पेठेतील माहेश्वरी समाजाच्या श्रीराम मंदिरातील अन्नकोट कार्यक्रमासाठी सह धर्मदाय आयुक्त यांनी बी.टी. पाचरणे यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती केली होती. 9 नोव्हेंबर 2015 रोजी पाचरणे यांच्या समक्ष माहेश्वरी समाज श्रीराम मंदिराच्या नावाचा फलक काढण्यात आला.
यावर हरकत घेत ऍड. शाम यांनी पाचरणे चुकीचे काम करत असल्याचे म्हणत त्यांच्या अंग़ावर धावून जाणे, तसेच धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शरद सरडा आणि न्यासाचे सचिव भगीरथ राठी व मंदिरातील व्यक्तीचे जबब नोंदवून सरकारी कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याच्या गुन्ह दाखल करून दोषरोपपत्र दाखल केले. यावर बचाव पक्षातर्फे युक्तीवद केला की, प्रथदमर्शनी गुन्हा केल्याचे दिसून येत नाही.
दोषरोपत्रात ठेवण्यात येणाऱ्या आरोपासाठी लागणारा पुरेसा पुरावा नाही. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखलाही दिला. केवळ हरकत घेणे व मुद्दे मांडणे आणि मोठ्या आवाजात बोलणे हा गुन्ह्यात नसल्यचे न्यायालयात सांगितले. त्यानुसार हा आदेश देण्यात आला.