मुंबई – देशात 2014पासून एक अत्याचारी सरकार आले आहे. या सरकारने सातत्याने विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र रचण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच गांधी परिवाराला टार्गेट करण्याचे आणि बदनाम करण्याचे काम या सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले.
पटोले म्हणाले, देशाच्या संपत्या विकणं, देशाची अर्थव्यवस्था बरबाद करुन देश विकण्याचं काम या सरकारने केले आहे. अशा या अत्याचारी सरकारविरोधी मुंबईत ईडी कार्यालयासमोर आमचं आंदोलन सुरु असल्याचे पटोले म्हणाले.
गांधी परिवाराचे या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठ योगदान आहे. त्यानंतर हा देश उभा झाला आहे. देश उभा करण्यात गांधी विचार आणि गांधी कुटुंबाचा मोठा आधार आहे. अशा या परिवाराला टार्गेट करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम केंद्राकडून सुरु आहे. फक्त कॉंग्रेस कार्यकर्तेच नाहीतर सामान्य कार्यकर्ते देखील गांधी परिवाराच्या पाठिमागे उभे राहिल्याचे पटोले म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारची उलटी गिणती सुरु झाली आहे. आज देशभरात कॉंग्रेसचे आंदोलन सुरु झाले आहे. चौकशी डाकू आणि चोरांची केली जाते. मात्र, सरकारकडून गांधी परिवाराला जाणीवपूर्वक अडकविण्याचे काम सुरु आहे. भाजपचे ऐकमेव टार्गेट हे नेहरु आणि गांधी परिवार असल्याचे पटोले म्हणाले.
नोटीस बेकायदेशीर – संजय राऊत
गांधी परिवाराला टार्गेट करुन बदनामीचे षडयंत्र – नाना पटोलेकॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. भाजपच्या विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास देण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा सुरू असलेला हा छळ हा देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.