बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात आमदार अतुल बेनके यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी गुरुवार (दि.11) केली. चक्रीवादळामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये विशेषत: केळी, द्राक्षे, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिसरात केळीच्या बागाच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. बेल्हे, गुंजाळवाडीतील शेतकऱ्यांना भेटून बेनके यांनी धीर दिला. यावेळी गोट्याभाऊ वाघ, अतुल भांबेरे, अशोक घोडके, तलाठी विजय साळवे, मंडल कृषी अधिकारी अनिल गंभीरे, कृषी अधिकारी राजश्री नरवडे, सावकार पिंगट आदी उपस्थित होते.