मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला असून, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद हाँल येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यातील राजकारणावर सडेतोड भूमिका मांडली आहे. तसेच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला असल्याचं दिसून आलं.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून, या सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुंबई शहरात महिलांवर अत्याचार होणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, ह्या विकृतीला कुठेतरी आळा बसला पाहिजे.
सध्या सरकार कोणत्याच विषयावर बोलायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे दंगलीचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा देखील राज्य सरकारनं विचार केला पाहिजे. त्या मागचा मास्टर माईंड कोण आहे? हे देखील शोधलं पाहिजे. असं अजित पवार यावेळी म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘सध्याच सरकार फक्त जाहिरात बाजीवर खर्च करत असून, सरकारी तिजोरीत असणारा पैसा वाया घालवत आहे. सगळीकडे जाहिरात बघायची नसली तरी यांचे चेहरे बघावे लागतात. राज्य सरकार काही करत नसून, फक्त झोपा काढत आहे.. असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.
यावेळी अजित पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकत्यांना देखील सल्ला दिल्याचं दिसून आलं. “आपण कुठं कमी पडतो हे लक्ष्यात घेतलं पाहिजे, तसेच भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही. भाकरी फिरवायची झाल्यास ती फिरवली पाहिजे’. असं अजित पवार यावेळी म्हणाले.