सातारा – सलग तीन दिवस असणाऱ्या सुट्ट्यांमुळे महामार्गावरही वाहनांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. वाहनांच्या गर्दीमुळे टोलनाक्यावरही मोठ्या रांगा लागत आहेत.
शुक्रवारी महाशिवरात्र आणि शनिवार व रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी असल्यामुळे अनेकांनी कुटुंबासह फिरण्याचे बेत आखले आहेत, तर अनेक युवक युवतीही पर्यटनासाठी घराबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर नेहमीपेक्षा वाहनांची संख्या अधिक होती. महामार्गावरील वाढलेल्या वाहनांच्या वर्दळीचा ताण टोलकर्मचाऱ्यांवर आल्याचे दिसत होते. नेहमीपेक्षाही मोठ्या रांगा टोलनाक्यावर लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना ताटकळावे लागत होते.