औरंगाबाद – राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला असून काही दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ऐन्हा उन्हाळयात राज्यात भारनियमनाचे संकट ओढविण्याची शक्यता आहे.
राज्यातील वीज प्रकल्पांना रोज सुमारे एक लाख ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो. मात्र जशी विजेची मागणी वाढते तसा कोळशाचा वापर देखील वाढतो. त्यामुळेच तर पुढच्या एक-दोन दिवसात कोळसा उपलब्ध न झाल्यास भारनियमन सुरू करण्यात येईल.
कोळशाची कमतरता ही केवळ राज्यातच नाही तर देशभरात कमी-जास्त प्रमाणात भासत आहे.
देशातील सत्तर टक्के वीज प्रकल्प हे कोळशावर अवलंबून आहेत. कोळशाचा पुरवठाला नैसर्गिक कारण अपेक्षा ही मानवी हस्तक्षेप अधिक जबाबदार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर कोळसा वेळेवर उपलब्ध नाही झाला तर पुन्हा राज्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.