मुंबई – रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात अंगभूत सर्वसमावेशकता असते. त्यामुळे पतधोरणावेळी सर्वच घटकांचा विचार केला जातो असे रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी म्हटले आहे.
भारतीय व्यवस्थापन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पात्रा म्हणाले की, भारतामधील विविध घटकांची परिस्थिती पाहता सर्वसमावेशक पतधोरण जाहीर करण्याची पद्धत विकसित झाली आहे.
त्यामुळे गरिबासाठी धोरणामध्ये वेगळा विचार करण्याची गरज नाही. महागाईचा गोरगरीबावर सर्वात जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे महागाई नियंत्रणात राहिल यासाठी प्रत्येक पतधोरणात काळजीपूर्वक विचार केला जातो.
त्यामुळे भारतातील गरीब आणि श्रीमंतातील दरी कमी होण्यास मदत मिळते. नागरिकांनी माफक प्रमाणात खर्च करावा आणि काही प्रमाणात बचत करावी अशा प्रकारचे पतधोरण राबविण्यात येत असते.
करोना व्हायरसच्या काळामध्ये भारत सरकारबरोबर इतर देशाच्या सरकारनी भांडवल सुलभतेच्या माध्यमातून बऱ्याच सवलती जारी केल्या होत्या. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र रिझर्व्ह बॅंक पतधोरण जाहीर करताना आर्थिक विकासाकडेही संतुलित पद्धतीने लक्ष देते