नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विकतांना अडचणी येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्व शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे, की भारतीय कापूस महासंघ आणि राज्यातील कापूस उत्पादक पणन महासंघ हमीभावानुसार कापसाची खरेदी करायाला तयार असून राज्यात या हमीदराने कापसाची खरेदी केली जात आहे.
महाराष्ट्रात, ऑक्टोबर 2019 पासून, हमीभावानुसार खरेदी सुरु आहे. 25 मार्च 2020 पर्यंत भारतीय कापूस महासंघाने 91.90 लाख क्विंटल म्हणजेच 18.66 लाख कापसाच्या गासड्याची खरेदी केली आहे. राज्यातील 83 केंद्रांवरुन ही खरेदी करण्यात आली असून या कापसाचे एकूण बाजारमूल्य 4995 कोटी रुपये एवढे आहे.
महाराष्ट्रात उत्पादित झालेल्या एकूण कापसापैकी, 25 मार्च 2020 पर्यंत 77.40 % कापसाची खरेदी उउख आणि खाजगी व्यापाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अद्याप 22.60 % कापूस बाजारात आला नाही. या कापसापैकी, सुमारे 40 ते 50 % कापूस, ज्याची किंमत सुमारे 2100 कोटी असेल.