नोव्हेल कोरोना (कोविड १९) या विषाणू मुळे सध्या जगभर अक्षरशः धुमाकूळ माजला आहे. भारतात केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सध्या सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अशा परिस्थिती मध्ये सामान्य माणसाने घाबरून न जाता नेमके काय करायला पाहिजे….
सोशल मीडिया वरून फिरणाऱ्या अफवांना बळी न पडता स्वतःची कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी.
शाळांना सुट्या दिल्याने मुलांना त्यांच्या घरी करण्यासारख्या सोपे उपक्रम तुम्ही सुचवू शकता का ?
आपत्ती व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी सरकारने प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत…?
याबाबत तुम्ही तुमचं मत मांडू शकता यंदाच्या बोला बिनधास्त मध्ये.
तुमचे लेख शुक्रवार २० मार्च पर्यंत आम्हाला पुढील मेल वर पाठवावेत…
prabhatcollegeconnect2.0@gmail.com
शब्द संख्या : १५० ते ३०० शब्द