नवी दिल्ली – कॉंग्रेसला (Congress) मतदान करणे म्हणजे बाबर आणि औरंगजेबाला जीवनसत्त्वे देणे, कारण कॉंग्रेसवाले बाबर आणि औरंगजेबासारखीच मानसिकता पाळतात. सनातनचा अंत करण्यात त्यांचा विश्वास आहे, अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कॉंग्रेसवर तीका केली आहे. नीलबाद, हुजूर येथे रामेश्वरच्या समर्थनार्थ जाहीर सभेत सरमा बोलत होते.
सरमा पुढे म्हणाले की, कर्नाटकात कॉंग्रेसच्या (Karnataka Congress) आगमनाने परिस्थिती कशी बदलली हे आपण सर्वांनी पाहिले आहे. एका विशिष्ट समुदायाला खूष करण्यासाठी कॉंग्रेसने कर्नाटकातील लव्ह जिहादविरोधी कायदा रद्द केला.
कॉंग्रेसला भगवान श्रीरामाची (Shree Ram) ऍलर्जी आहे. निवडणुकीपूर्वी त्यांचे नेते आणि तथाकथित हनुमान भक्त श्री रामजन्मभूमी सोडून प्रत्येक मंदिराला भेट देतात, पण त्यांना रामलला कधी दिसणार?
सरमा असेही म्हणाले की, शिवराज सरकारमुळे मध्य प्रदेशातून आजारी राज्याची बिरुदावली गेली आहे. आज रामेश्वर शर्मा (Ramweshwar Sharma) यांच्या नेतृत्वाखाली हुजूरमध्येही विकासाची गंगा वाहत आहे. रामेश्वर शर्मा रात्रंदिवस सक्रीय असणारा मेहनती व्यक्ती आहे. हा हुजूरांचा नेता आहे.