नवी दिल्ली – ग्राहक सक्षमीकरण हे विकसित भारताचे मुख्य वैशिष्ठ्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले. नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सीमावर्ती भागातील प्रश्न सोडविण्यासाठी परस्पर समन्वय व्यापक व दृढ करावा – राज्यपाल कोश्यारी
“ग्राहक आयोगांमध्ये दाव्यांचा प्रभावी निपटारा’ ही संकल्पना सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करते. तक्रारदार ग्राहकांना जलद न्याय देण्याच्या हमीसोबतच व्यापक स्तरावर देशाला वेळेवर न्याय देण्याची हमी आहे. एककेंद्राभिमुखतेमुळे नियम पालनासाठी उद्योग आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर लादलेले नियमांचे ओझे कमी होईल. गेल्या काही वर्षात 1,500 अनावश्यक कायदे मोडीत काढले आहेत.
जवळपास 39,000 नियम सुलभ केले आहेत तसेच किरकोळ चुका गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय हेल्पलाइन पूर्वी फक्त दोन भाषांमध्ये होती त्यामध्ये आता इतर भाषा समाविष्ट केल्या गेल्या आहेत त्यामुळे आता ही सेवा बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे जेणेकरून ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मातृभाषेत या हेल्पलाइनवर संभाषण साधता येईल, असे गोयल यांनी नमूद केले.