Rahul gandhi – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपवर सतत हल्लाबोल करतात. यावेळी त्यांनी खासदार आणि केंद्राच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी ओबीसी कार्डचा वापर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी ओबीसी कार्डच्या माध्यमातून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज राहुल गांधी जनतेला संबोधतांना अशोक नगरमध्ये ओबीसी जनगणनेबद्दल बोलले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल प्रश्न उपस्थित केले. एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की भारतात एकच जात आहे, ती म्हणजे गरीब. एकीकडे ते म्हणतात माझे नाव नरेंद्र मोदी, मी ओबीसी आहे आणि दुसरीकडे ते म्हणतात भारतात एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीब. ते पुढे म्हणाले, मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिले ते मला सांगायचे आहे. मी लाखो तरुणांना भेटलो आणि जेव्हा मी त्यांना विचारायचो, भाऊ, तू बेरोजगार आहेस, तुझी जात कोणती, ते मला सांगायचे,’ मी ओबीसी आहे, मी दलित आहे, मी आदिवासी आहे.’ असेही राहुल गांधी म्हणाले.
यानंतर जात जनगणनेची बाजू मांडताना राहुल गांधी म्हणाले, “मग माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला… या देशात किती ओबीसी आहेत, किती दलित, किती आदिवासी, किती सामान्य प्रवर्गातील… आणि हे लोक, हे वर्ग… भारत “सरकार चालवण्यात त्यांचा किती वाटा आहे… हा साधा प्रश्न आहे, जर या देशात ५०% ओबीसी असतील तर सरकार चालवण्यात ५० टक्के सहभाग असायला हवा.” असं म्हणत राहुल गांधी यांनी ओबीसी कार्डच्या माध्यमातून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.