नवी दिल्ली – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. कॉंग्रेसला प्रश्न करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी सर्वाधिक वेळा कलम 356 चा गैरवापर केला आहे.इतिहासावर नजर टाकून पहा, कोणत्या पक्षाने कलम 356 चा सर्वाधिक गैरवापर केला अशा कडक शब्दात गुरुवारी राज्यसभेत पंतप्रधानांनी कॉंग्रेसला धारेवर धरले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कॉंग्रेसने नव्वद वेळा निवडून आलेली सरकारे पाडली. माजी पंतप्रधानांनी कलम 356 नव्वद वेळा वापरले. ‘एका पंतप्रधानाने कलम 356 तब्बल 50 वेळा वापरले, त्यांचे नाव श्रीमती इंदिरा गांधी आहे.’देश कॉंग्रेसला वारंवार नाकारत आहे, पण कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या कारस्थानांपासून परावृत्त होत नाहीत. जनता हे पाहत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांना शिक्षाही करत आहे.” असं स्पष्ट अंत पंतप्रधांनी यावेळी व्यक्त केले.
साठ वर्षांपासून कॉंग्रेस परिवाराने केवळ खड्डेच केले. खड्डे खणत असताना त्यांनी 6 दशके वाया घालवली, तेव्हा जगातील छोटे देशही यशाच्या शिखरावर पोहचले होते असं पंतप्रधान म्हणाले. पीएम राज्यसभेत म्हणाले की, जेव्हा कोणी सरकारमध्ये येतो तेव्हा तो देशासाठी काही आश्वासने घेऊन येतो, परंतु केवळ भावना व्यक्त करून फायदा होत नाही. विकासाचा वेग काय आहे, विकासाचा पाया, दिशा, प्रयत्न आणि फलित काय आहे, याला खूप महत्त्व आहे असही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.