नवी दिल्ली – भाजपने (bjp) हेराफेरी करून राज्यात सत्ता काबीज केली होती, हे कॉंग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि राज्यातील जनता विसरणार नाहीत. 2020 ची फसवणूक राज्यातील जनताही विसरली नसल्याचे दिसून येत आहे. शिवराज सिंह (Shivrajsingh) हा जुना आणि थकलेला चेहरा असून, भाजप नेतृत्वाने चौहान यांच्यावर अविश्वास असल्याचे अनेक प्रकारे सूचित केले आहे. अशा स्थितीत भाजप नेतृत्वाने काही केंद्रीय मंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या हृदयात मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा जागवली आहे.(MP Election)
मधल्या 15 महिन्यांचा कालावधी वगळता 2003 पासून राज्यात भाजपची सत्ता असून, आता सत्ताबदल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कॉंग्रेससाठी सत्तेचा मार्ग सोपा असल्याचे मानले जात आहे.अशातच “मामाजी की सरकार’ ने (Mamajiki sarkar) लपवलेला “व्यावसायिक परीक्षा मंडळ’ घोटाळा भाजपला पुन्हा एकदा महागात पडू शकतो, असेही मानले जात आहे. म्हणूनच कॉंग्रेसने (Congress) मध्य प्रदेशात सर्वस्व पणाला लावले असल्याचे दिसते
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक देश, एक निवडणूक’ सुरू करणार आहेत, हा समज उध्वस्त झाला. ‘एक देश-एक निवडणूक’ शक्य नाही, आणि 2023 किंवा 2024 मध्ये नक्कीच शक्य नाही, असे आता स्पष्ट झाले आहे.
काही टीकाकारांनी पाच राज्यांतील या निवडणुकांचे वर्णन एनडीए आणि ‘इंडिया’ यांच्यातील कसोटी असे केले आहे. मात्र जेडीयू, शिवसेना, अकाली दल आणि अण्णाद्रमुकच्या बाहेर पडल्यानंतर आता जुना एनडीए राहिला नाही.