नवी दिल्ली: सध्या भारतात दररोज मोबाईलच्या ग्राहकांची संख्या वाढताना दिसत आहे. नवे सिमकार्ड घेऊन नवे कनेक्शन मागणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ आहे. सध्या भारतात 9, 8 आणि 7 या क्रमांकाने सुरू होणाऱ्या 10 अंकी मोबाइल नंबरमध्ये 2.1 अब्ज (210 दशलक्ष) कनेक्शन देण्याची क्षमता आहे. मात्र आता ही क्षमता संपत चालल्याने आणि 7 पेक्षा खालच्या नंबरने बॅंडविड्थ उपलबध नसल्याने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय (ट्राई) लवकरच 11 अंकी मोबाईल नंबर्सची तयारी करत आहे. असे अंक वाढविण्यासाठी ट्रायनेही एक अहवाल जारी केला आहे. असे झाल्यास नजिकच्या भविष्यातले ग्राहकांचे मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकांचे असतील.
ट्रायच्या म्हणण्यानुसार, देशातील दूरसंचार कनेक्शनबाबत लोकांच्या गरजा भागविण्यासाठी 2050 पर्यंतचा कालावधी लागेल. तसेच 200 दशलक्ष गुणांची देखील आवश्यकता असेल. यामुळे ट्राय फोनच्या अंकांची संख्या वाढवू शकते. त्याचबरोबर, देशात सध्या नऊ, सात आणि आठ क्रमांकापासून सुरू होणाऱ्या 10-अंकी मोबाइल नंबरसाठी 210 दशलक्ष कनेक्शनची क्षमता आहे. इतकेच नाही तर ट्राय लॅंडलाईन क्रमांकाची संख्या 10 अंकी बदलू शकते. त्याचबरोबर डोंगलचे कनेक्शन क्रमांक 13 अंकात बदलले जातील, असे समजते.
वर्ष 1993 आणि 2003 साली ट्रायने मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले होते. वर्ष 2003 च्या नंबरिंग प्लॅनने 750 दशलक्ष फोन कनेक्शनसाठी जागा तयार केली. त्यापैकी 450 दशलक्ष मोबाईलसाठी आणि 300 दशलक्ष मूलभूत किंवा लॅंडलाईन फोनसाठी नंबर्स देण्यात आले.
ट्रायच्या म्हणण्यानुसार, जोडणीच्या मागणीमुळे संख्याबळ संसाधनांचा (स्टॅटेस्टीकल सोअर्सेस) धोका वाढू शकतो. या कारणास्तव, ट्राय मोबाइल फोनच्या अंकांची संख्या वाढवू इच्छित आहे. या व्यतिरिक्त ट्रायनेही या विषयावर लोकांना त्यांचे मत विचारले आहे.