नवी दिल्ली – अल कायदाचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याने भारतातील हिजाब वादावरून भाष्य केले. भारतीय उपखंडात इस्लामवर माध्यमे वापरून होणाऱ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मुस्लिमांनी एकत्र यावे आणि शस्त्र घेऊन रणांगणात उतरावे, असे तो म्हणाला.
त्याच्या आवाहनाच्या व्हिडिओमुळे तो जीवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक कारणांमुळे त्याचा मृत्यू 2020 मध्ये झाल्याचे मानण्यात येत होते. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ अल कायदाने प्रसारीत केले होते. मात्र त्यात सर्वांममध्ये तो केवळ ऐतिहासिक संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे हे व्हिडिओ जुने असल्याचे मानण्यात येत होते.
अल कायदाचे मुखपत्र असणाऱ्या अल – साहब माध्यमात अल जवाहिरीचा सुमारे नऊ मिटांचा व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला. त्यात त्याने कर्नाटकमध्ये जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या हिंदु जमावाला सामोरे जात अल्लाहू अकबरच्या घोषणा देणअऱ्या मुलीची स्तुती करत जवाहिरी म्हणाला, तिच्या धीट घोषणांनी तीने हिंदु पुरातनवाद्यांना आव्हान दिले आणि जिहादची भावना जागवली. तीने मुस्लिम समाजाला जागे केले.
या व्हिडिओत खानची क्लिप सुरवातीला दाखवण्यात आली असून त्यानंतर जवाहिरीचे भाषण सुरू होते. या संपूर्ण व्हिडिओत तो केवळ याच मुद्द्याबाबत बोलत आहे. तिने मुस्लिम आणि त्यांच्या शत्रूंच्या युध्दाचा खरा चेहरा बाहेर काढला आहे. पाश्चिमात्य देशात न्यूनगंड बाळगणाऱ्या मुस्लिम महिलांना धडा दिल्याबद्दल अल्लाह तीच्यावर अपार कृपा करेल. हिंदू भारतातील कथित लोकशाही आणि त्याचे स्वरूप उघड केल्याबद्दल अल्लाह तिला पुरस्कार देईल, असे जवाहिरी म्हणाला. तिच्या धाडसामुळे मी कवी नसूनही मला काव्य लिहावे वाटले असेही त्यांने सांगितले.
उपखंडातील मुस्लिमांना संदेश देताना जवाहिरी म्हणाला, आपण हिंदु लोकशाहीच्या मृगजळामामगे धावणे थांबवले पाहिजे. त्याचा वापर केवळ मुस्लिमांना दाबून ठेवण्यासाठी केला जातो. आपल्याला हे ओळखलंच पाहिजे, प्रत्यक्ष जगात मानवी हक्क, घटनेबाबत आदर किंवा कायदा किंवा असल्या कोणत्याही मुर्खपणाच्या गोष्टी नसतात.
जवाहिरीच्या मते, पाश्चिमात्य राष्ट्रांनी अशा गोष्टीतून मुस्लिम विरोध सुरू केला. याचे खरे स्वरूप फ्रान्स, हॉलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये समोर आले जेंव्हा त्यांनी हिजाबवर बंदी घातली आणि सार्वजनिक नग्नतेचा पुरस्कार केला. इस्लामचे शत्रू तेच आहेत मुस्लिमांच्या हिजाबशी इजिप्तमध्ये लढत आहेत. तेच हे संधीसाधू ठग आहेत… लेखक, पत्रकार अणि विकत घेतलेले धर्मपंडीतही… जे हिजाब आणि शरीयतला आव्हान देतात. हे इस्लामविरुध्दचे युध्द आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून
जवाहिरीच्या वक्तव्याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे. जर माध्यमांपुडे भारताच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे तर अशा वेळी या एकाच मुद्द्यावर जवाहिरीने एवढे बोलणे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भरतीसाठी भारत पोषक असल्याचे अल कायदा मानत आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात यंत्रणा उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकेल. आपल्या अनुयायांना प्रेरणा देण्याचाही त्याचा उद्दे श असू शकेल, असे सुरक्षा यंत्रणांमधील अती वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.