नारायणगाव -जिल्ह्यात आणखी थंडीची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा हुडहुडी भरणार आहे. या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच जिल्ह्यातील गाळपास जाणाऱ्या उसाचा साखर उतारा वाढणार आहे. याचा दुहेरी लाभ साखर कारखानदार, शेतकऱ्यांना होणार आहे.