CM Himanta Biswa Sarma : राजस्थानमध्ये येत्या 25 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकी पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय राजकीय सभांचा फेरा सुरूच आहे. याशिवाय नेत्यांची भाषणेदेखील समोर येत आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. ते एकमेकांवर आरोपही करत आहेत. याच आरोपांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी यावेळी यावेळी बोलताना,”मी उघडपणे हिंदू राजकारण करतो, यात काय अडचण आहे. या देशात हिंदू म्हणजे सर्वांचा आधार, सर्वांचा विश्वास. जर हिंदू भारतीय असेल तर हिंदू राजकारण करायला काय हरकत आहे. काँग्रेसला सांगा की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूच राहू.असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
यापूर्वी हेमंत बिस्वा सरमा यांनी प्रतापगडमध्ये, संपूर्ण राजस्थान वैज्ञानिक पद्धतीने लुटले गेले आहे. जर आपण राजस्थान आणि आसामची अर्थव्यवस्था आणि भूगोलात तुलना केली. आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. आम्ही लोकांना ९७-९८ रुपये लिटर पेट्रोल देतो. हरियाणा आणि यूपीमध्ये 94-95 रुपये आहे, राजस्थानमध्ये 108-110 रुपये आहे आणि प्रियंका गांधी इथे येतात आणि सांगतात की मी गरिबांच्या पाठीशी आहे.” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा उघडपणे मदरसे बंद करण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, “सरकारकडून पैसे आणि पगार घेणारे सर्व मदरसे बंद करावेत. एखाद्या समाजाने ते स्वतंत्रपणे चालवले तर तो वेगळा मुद्दा आहे. सरकारी पगार असलेले मदरसे बंद करावेत. समुदाय चालवल्या जाणाऱ्या मदरशांचेही नियमन व्हायला हवे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्काच्या सुविधा मिळाव्यात. मदरसे ही ‘मुल्ला’ निर्माण करणाऱ्या संस्था नसावी” असेही त्यांनी म्हटले.