रांची: चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू यादव यांच्याशिवाय या प्रकरणातील 38 दोषींनाही सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एसके शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवर सुनावणीसाठी 21 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली.
सीबीआयचे विशेष वकील बीएमपी सिंह यांनी रविवारी सांगितले की, विशेष न्यायालयाने शनिवारी निर्देश दिले यामध्ये 15 फेब्रुवारी रोजी दोषी ठरलेल्या 41 आरोपींपैकी 38 आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात आली. ते म्हणाले की, अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने तिघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
सिंह म्हणाले की, शिक्षा सुनावण्यात येणार्या 38 दोषींपैकी 35 बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्यासह अन्य तीन दोषींना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष वकिलाने सांगितले की, तुरुंग प्रशासनाने सर्व 38 दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्याची व्यवस्था केली होती.
लालू प्रसाद यांच्या व्यतिरिक्त डॉ.के.एम.प्रसाद आणि यशवंत सहाय हे RIMS मध्ये भरती आहेत.बिरसा मुंडा तुरुंगाचे अधीक्षक हमीद अख्तर यांनी सांगितले की, रिम्समध्ये दाखल झालेल्या तीन दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यासाठी लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली होती. सिंह म्हणाले की, न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे.
चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय?
- चारा घोटाळ्याचा घटनाक्रम चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे.
- 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवलं गेलं.
- 10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली की, लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई व्हावी.
- 23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
- 29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.
- 12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांची सुटका झाली.
- 28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली.
- मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
- 2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
- चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते
- याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत.