बेंगळुरू – “चांद्रयान-3’ने 14 जुलै रोजी अवकाशात यशस्वीरित्या झेपावल्यानंतर या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आता हे यान अंतराळात चांगल्या वातारणात असून, ते चंद्राकडे आगेकूच करीत आहे, अशी माहिती इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.
चंद्रावर पाण्याच्या शोधासाठी पाठविलेले चंद्रयान-3 हे यान 14 जुलै रोजी विक्रम साराभाई आंतरराळ केंद्र (इस्रो)तून चंद्राच्या दिशेने झेपावले.
या अभूतपूर्व क्षणाचे सर्वजण साक्षी होते. 44 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्रावर उतरविले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना इस्रोचे प्रमुख एस. उन्नीकृष्णन नायर म्हणाले की, आजपासून यानासोबत असलेले अनबोर्ड थ्रस्टर्स उडविले जाणार आहे आणि यानाला चंद्रावर उतरविण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणापासून दुर केले जाणार आहे. तर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, नासा या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थेच्या दाव्यानुसार चंद्राच्या दक्षिणि ध्रृवावर बर्फ आहे. या भागात नैसर्गिक संसाधने असू शकतात. त्यामुळे चांद्रायान-3 या मोहीमेचा चंद्रावर पाणी आहे की नाही हे पाहणे हा महत्वाचा उद्देश असून, जर तिथे आणखी काही सापडले तर ती विज्ञानासाठी मोठी उपलब्धी ठरेल.