मुंबई – सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये विकास दराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने खर्च वाढविण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारची वित्तीय तूट वाढली तरी त्याची फार काळजी करण्याची गरज नाही असे ज्येष्ठ बॅंकर एम व्ही कामात यांनी म्हटले आहे.
सरकारने धाडस करून तूट वाढली तरी खर्च करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सरकारने अशा प्रकारचे धाडस अर्थसंकल्प सादर करताना केले आहे. मात्र दुसऱ्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारकडून आणखी धाडसी निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने अगोदरच पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. असे आणखी निर्णय घेण्याची गरज आहे. काही उद्योजकांनी तूट कमी करण्यासाठी नोटा छापण्याची सूचना केली आहे. मात्र सरकारने ती शक्यता फेटाळून लावली आहे. लॉक डाऊनच्या काळात भारतातील बॅंकानी चांगली कामगीरी केली आहे. आगामी काळात बॅंकोंच व्यवहार वाढण्यीाच शक्यता असल्याचे त्यानी सांगितले.