वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांचे कचेरीसमोर आंदोलन
नगर – तालुक्यातील वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्याच्या अधिग्रहित जमिनीवरील अधिसूचित क्षेत्र वगळावे, एमआयडीसीच्या नोंदी त्वरित रद्द कराव्यात. सात-बारा उताऱ्यावरील महाराष्ट्र शासनातर्फे उद्योग उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई 32 शिक्का काढण्यात यावा. या मागणीसाठी शेतकऱ्यानी मंगळवार (दि.6) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी उपोषन केले.
वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर प्रशासननाने 2012 साली शिक्के मारले आहे. एमआयडीसीसाठी ह्या जामिनी घेण्यासाठी भूसंपादन करण्याचे काम चालू आहे. या जामिनी देण्यासाठी येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांची जमिनी ह्या सर्व बागायत असून, जमिनी भूसंपादन केल्या तरी येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे उदरनिर्वाहाचे साधन राहणार नाही. यापूर्वीही प्रशासनाने वडगाव गुप्ता च्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित केल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी एमआयडीसी येथे बोलली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी भूसंपादनास तीव्र विरोध दर्शवून या प्रकारचा ठरावी कारवाईसाठी पाठवण्यात आला होता. हा ठराव पाठवून दहा महिन्याचा कालावधी गेला.
तरी अद्याप पर्यंत एमआयडीसीने व शासनाने कोणताही निर्णय ग्रामपंचायत व संबंधित शेतकऱ्याला कळवलेला नाही. प्रशासनाने जमिनी संपादन करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. तरी जमिनी अधिग्रहण ची कार्यवाही थांबावी. जमिनी वरील लावलेल्या नोंदी रद्द कराव्यात. सात बारा वरील महाराष्ट्र शासनाच्या नोंदीचा शिक्का काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परीषद सदस्य प्रताप शेळके, संदेश कार्ले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, पराग गुंड प्रकाश डोंगरे, विजय डोंगरे, किसन कदम, प्रभाकर शेवाळे, सुरेश घोरपडे, रामदास जाधव, बबन भोसले, विठ्ठल गवारे, विश्वनाथ झिने, भानुदास सातपुते, परसराम गुंड, बबन झिने, भाऊसाहेब साबळे, सुरेश वामन, लक्ष्मण गुंड, मधुकर शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, श्रावण सातपुते, गोरख आढावा यांच्यासह या गावांतील प्रकल्प बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने 2012 पासून शेतकऱ्याच्या उताऱ्यावर शासनाचे शिक्के मारल्यामुळे ह्या जमिनीवर कर्ज काढता येत नाही. कुठलेही व्यवहार करता येत नाही. ह्या जमिनी अधिग्रहण केल्या तर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहिन होतील.
प्रकाश डोंगरे , शेती बचाव कृति सामिती वडगाव गुप्ता