अलाहाबाद : विधी शाखेच्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायलयाने जामीन मंजूर केला. त्यावेळी कोणाची कोणाची पिळवणूक केली हे ठरवणे अवघड आहे. दोघांनीही एकमेकांचा वापर करून घेत असल्याचे मत न्यायालयाने यावेळी नोंदवले.
शहाजानपूर या मुळ गावात हा खटला चालवला गेल्यास हा भाजपा नेता त्यावर प्रभाव टाकू शकतो, हा पिडीतेचा आक्षेप मान्य केत हा खटला लखनौ न्यायलयात चालवण्यास न्या. राहुल चतुर्वेदी यांनी मान्यता दिली. चिन्मयानंद याच्या ट्रस्टकडून चालवण्यात येणाऱ्या विधी महाविद्यालयात ही तरूणी शिकत असे. तिचे अनेक महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला. या प्रकरणी चिन्मयानंदला 20 सप्टेंबरला अटक केली होती. त्याचवेळी या महिलेला पाच कोटी रूपयांची खंडणी चिन्मयानंदकडे मागितल्याच्या आरोपवरून अटक करण्यात आली होती. तिला चार डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. या महिलेने शूट केलेले व्हिडिओ दाखवून ही युवती आणि तिचे तीन मित्र ब्लॅकमेल करत असल्याच्या आरोपाची दखल जामीन देताना घेतली. त्याचवेळी राजकीय नेत्यांसाठी हा संदेश आहे, असे म्हटले आहे.
सध्याच्या स्थितीत कोणी कोणाचा छळ केला हेच न्यायालयाला ठरवावे लागेल. यापुर्वी म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूंना मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे या स्थितीत कोणी कोणाची पिळवणूक केली हे ठरवणेच अवघड आहे. या युवतीवर अत्याचार होत असताना तीने आपल्या कुटुंबियांकडे त्याबाबतची साधी तक्रार केली नाही किंवा चकार शब्दही उच्चारला नाही, हेही लक्षणीय असल्याचे न्यायलयाने म्हटले आहे. मात्र या टीप्पणीचा विचार सुनावणीच्या वेळी करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.