Bollywood Stars Marriage: बॉलीवूड स्टार्सचे कार्य कोणतेही असो, चाहत्यांमध्ये चर्चा होणे ही काही नवीन गोष्ट नाही. अभिनेत्यांच्या मुलांच्या वाढदिवसापासून ते त्यांच्या लग्नाच्या पार्टीपर्यंत काहीतरी खास घडते. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे (Bollywood actress Parineeti Chopra) शाही लग्न सध्या चर्चेत आहे. पण काही बॉलीवूड स्टार्स असे होते, ज्यांच्या लग्नाला ग्लॅमरच्या दुनियेची चाहूल लागली नाही.
असे काही स्टार्स आहेत ज्यांच्या लग्नाबद्दल लोकांना माहितीही नसते. आता याला कंजूषपणा म्हणा, साधेपणा म्हणा की श्रद्धा… पण या स्टार्सचा विवाह मंदिरात काही लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यातील एक नाव असे आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते खरे आहे.
या स्टार्समध्ये पहिले नाव येते ते म्हणजे संजय दत्तचे (Sanjay Dutt). बॉलिवूडच्या ‘मुन्ना भाई’ने रिया पिल्लई (Riya Pillai) सोबत मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले. हे त्यांचे दुसरे लग्न होते. आजही लोकांचा यावर विश्वास बसत नाही. मात्र, लग्नाच्या 10 वर्षांनी संजय दत्त-रिया पिल्लई वेगळे झाले.
या यादीत पुढचे नाव आहे परेश रावल (Paresh Rawal) यांचे.. ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. परेश रावल यांनी लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन स्वरूप संपत (Swaroop Sampat) यांच्याशी लग्न केले. दोघांनी 1987 मध्ये लग्न केले होते. परेश आणि स्वरूप यांच्या लग्नाला 36 वर्षे झाली आहेत. दोघेही एकत्र आनंदी आहेत. त्यांना दोन मुलगे देखील आहेत, ज्यांची नावे आदित्य आणि अनिरुद्ध आहेत.
बॉलिवूडमध्ये ‘हवा हवाई’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री श्रीदेवीच्या (actress Sridevi) लग्नाची कहाणीही अशीच आहे. श्रीदेवीने प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी मंदिरातच लग्न केले होते.
‘विवाह’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रत्येक सिनेप्रेमीचे मन जिंकणाऱ्या अमृता रावचे लग्नही अगदी साध्या पद्धतीने पार पडले. मंदिरातच तिने आरजे अनमोलशी लग्न केले. त्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा लोकांना त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली आणि आश्चर्य वाटले.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा विवाह 29 जून 2012 रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरात झाला. धर्मेंद्र आणि हेमा यांनी या लग्नात फार मोठा खर्च केलेला नाही.
‘हम आपके है कौन’ या चित्रपटात दमदार अभिनय करणारी अभिनेत्री रेणुका शहाणेनेही अभिनेता आशुतोष राणासोबत मंदिरातच लग्न केले. या दोघांचे लग्नही अतिशय थाटामाटात पार पडले.
गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-सीरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांनीही त्यांचे लग्न अत्यंत साधेपणाने केले. वैष्णोदेवी मंदिरात अभिनेत्री दिव्या खोसलासोबत त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू केला.