नवी दिल्ली – भाजपचे जातीयवादी राजकारण आम्ही केरळ राज्यात रुजू देणार नाही आणि भाजपला केरळातील लोकसभेची एकही जागा जिंकता येणार नाही असे प्रतिपादन केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना विजयन म्हणाले की, संघ परिवाराने देश आणि तेथील लोकांसमोर उभ्या केलेल्या आव्हानांवर डावी आघाडी मित्र पक्षांच्या मदतीने मात करेल आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यचे काम करेल. भाजपला सत्तेवरून खाली पाडण्याच्या उद्देशाने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यामुळेच आम्ही राष्ट्रीय पातळीवरील भाजपविरोधी आघाडीत सक्रियपणे सहभागी झालो आहोत असे ते म्हणाले.
आम्ही एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. भाजपला केवळ पराभवाला सामोरे जावे लागणार नाही तर केरळातील सर्व २० जागांवर ते दुसऱ्या क्रमांकावरही राहणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षावरही हल्ला चढवला आणि म्हटले की, डाव्यांचा जातीयवादी फॅसिस्टांशी लढण्याचा इतिहास पण भाजपशी लढण्यात कॉंग्रेस कमजोर ठरत आहे.
आम्ही काही मतांसाठी आमचे राजकारण किंवा तत्वे बदलत नाही,असेही ते म्हणाले. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागांसाठी 26 एप्रिलला निवडणूक होणार आहे.