नवी दिल्ली – राजदचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल बारी सिद्दीकी हे देशातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. मुस्लिमांसाठी देश असुरक्षित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील मुस्लिमांसाठी वातावरण खराब आहे, त्यामुळे मी परदेशात शिकणाऱ्या माझ्या मुलांना देशात परत न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या विधानावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
#WATCH देश का माहौल ऐसा है कि एक बड़ी अल्पसंख्यक आबादी के मन में ये भाव है कि इस देश में हम सुरक्षित नहीं हैं और बेहतर होगा की हम बाहर चले जाएं… देश में शासन चलाने वाली पार्टी इस बात पर चिंतन नहीं कर रही: राजद नेता शिवानंद तिवारी, पटना pic.twitter.com/xGSnpuzZ6b
— ANI_HindiNews (@AHindinews) December 23, 2022
या वक्तव्यावर माजी मंत्री भाजप नेते रामसुरत राय यांनी अब्दुल बारी सिद्दीकी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. रामसुरत राय म्हणाले की, ‘ज्या देशात वातावरण चांगले आहे, तेथे जा. जाण्याचा खर्च मी देईन.’ असं म्हणत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता राजद नेते शिवानंद तिवारी यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिउतर दिले आहे.
मुस्लिमांसाठी असुरक्षित, म्हणून मी माझ्या मुला – मुलीला…’ – राजद नेत्याचे वक्तव्य
माध्यमांशी बोलतांना शिवानंद तिवारी म्हणाले,’देशातील वातावरण असे आहे की मोठ्या अल्पसंख्याक लोकांच्या मनात अशी भावना आहे की आपण या देशात सुरक्षित नाही आणि आपण बाहेर पडलो तर बरे होईल… देशावर राज्य करणारा भाजप पक्ष याचा विचार करत नाही’ असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांच्या टीकेवर प्रतिउत्तर दिले आहे.