नवी दिल्ली – भाजप नेते नेहमीच त्यांचा वादग्रस्त मुद्यांवरून चर्चत असतात. यावेळी गांधी टोपी पंडित जवाहरलाल नेहरू परिधान करायचे, महात्मा गांधी नाही असं ट्विट केल्यामुळे नव वादंगाला सुरुवात झाली आहे.
भाजपाच्या गुजरात युनिटचे नवनियुक्त सरचिटणीस रत्नाकर यांनी गांधी टोपी पंडित जवाहरलाल नेहरू परिधान करायचे, महात्मा गांधी नाही. असे विधान केले आहे. त्यांचा या विधानावर आता काँग्रेसने त्यांचा या विधानांवर टीका केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, ते आता स्वातंत्र्य सेनानी आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवर बोट दाखवत आहेत असं म्हटलं आहे