Bharat Jodo Nyay Yatra – भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसामध्ये आहे.या यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. जात, पंथ आणि धर्माच्या नावावर देशाचे विभाजन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा उद्देश देशातील लोकांना एकत्र करणे आहे. धर्म आणि भाषेच्या नावावर भाजप लोकांना आपसात भांडायला लावत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सध्या ही यात्रा आसाममध्ये आहे, जिथे पक्षाचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बराच संघर्ष पाहायला मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?
या भेटीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले भाजपला फक्त काही उद्योगपतींचा फायदा करायचा आहे, त्यांना गरिबांची चिंता नाही, तर दुसरीकडे काँग्रेस लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी काम करते. आसामचे मुख्यमंत्री यात्रेला मिळणाऱ्या प्रेमामुळे घाबरले आहेत. अस म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले, आम्ही अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा दिला आणि आमचा पक्ष गरीबांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि तरुण, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या भल्यासाठी काम करण्यासाठी नेहमीच तयार आहे. तर भाजपच्या राजवटीत ना सरकार लोकांच्या तक्रारी ऐकायला तयार होत नाहीये तसेच येथील लोकांचे प्रश्न मीडियाने सुद्धा मांडले नाही. मात्र प्रवासादरम्यान मी ठिकठिकाणी थांबून लोकांच्या वेदना ऐकत आहे.” असेही ते म्हणाले आहे.