मुंबई – एका बाजूला पावसाने हुलकावणी तर दुसऱ्या बाजूला खतांसह बियाणांच्या वाढलेल्या किंमतींनी शेतकरी अचडणीत सापडला आहे. असे असतानाही सरकार आपल्या जाहिरातबाजीत मग्न आहे. यावरून रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. शेतकरी अडचणीत आहे. आमदार रोहित पवारांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात यूरिया खताची पिशवी दिसत आहे, ज्यावर ठळक अक्षरात भाजप लिहिल्याचे दिसते. यावरून रोहित पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरवाढीचं कारण देत केंद्र सरकार खतांच्या किंमती भरमसाठ वाढवतं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती कमी झाल्यानंतरही देशांतर्गत खतांच्या किंमती मात्र कमी न करता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून नफेखोरी करतंय.. आणि आता तर खतांच्या पिशवीवर #भाजप हे नाव… pic.twitter.com/dh5Xjsqz1N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 19, 2023
आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरवाढीचे कारण देत केंद्र सरकार खतांच्या किंमती भरमसाठ वाढवते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती कमी झाल्यानंतरही देशांतर्गत खतांच्या किंमती मात्र कमी न करता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून नफेखोरी करत आहे. तसेच आता तर खतांच्या पिशवीवर “भाजप’ हे नाव छापून शेतकऱ्यांच्या जीवावर फुकटात जाहिरातबाजी सुरू आहे. केंद्र सरकारला चमकोगिरीची फारस हौस असेल तर या जाहिरातीचे पैसे भाजपाकडून वसूल करावेत, असेही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.