पाटना – बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय जनता दलाने केला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबतची एक यादीच ट्विट करण्यात आली असून महाआघाडीचे ११९ उमेदवार जिंकले असतानाही त्यांना याबाबतचं प्रमाणपत्र दिलं जात नसल्याचं म्हंटलंय.
ये उन 119 सीटों की सूची है जहाँ गिनती संपूर्ण होने के बाद महागठबंधन के उम्मीदवार जीत चुके है। रिटर्निंग ऑफ़िसर ने उन्हें जीत की बधाई दी लेकिन अब सर्टिफ़िकेट नहीं दे रहे है कह रहे है कि आप हार गए है। ECI की वेबसाइट पर भी इन्हें जीता हुआ दिखाया गया। जनतंत्र में ऐसी लूट नहीं चलेगी। pic.twitter.com/puUvIagyDz
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 10, 2020
ट्विटद्वारे, ‘हिलसा येथील उमेदवार शक्ती सिंह यांना निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांनी प्रथम आपण ५४७ मतांनी जिंकले असल्याचं जाहीर करत शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानावरून फोन आल्यानंतर पोस्टल बॅलेट रद्द केल्याचं सांगत आपण १३ मतांनी हरल्याचं सांगण्यात आलं’ असाही आरोप करण्यात आलाय.
हिलसा विधानसभा क्षेत्र से राजद प्रत्याशी शक्ति सिंह को निर्वाचन अधिकारी ने 547 वोट से विजयी घोषित कर दिया था। सर्टिफ़िकेट लेने के लिए इंतज़ार करने को कहा गया। सीएम आवास से RO को फ़ोन आता है। फिर अचानक अधिकारी कहते है पोस्टल बैलेट रद्द होने के कारण आप 13 वोट से हार गए।
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 10, 2020
आणखी एका ट्विटमध्ये, मुंगेर विधानसभा मतदारसंघात राजदच्या उमेदवाराची टपाली मते रद्द करण्यात आली असून चार ईव्हीएम मशिन्सची मोजणीचा केली जात नसल्याचा आरोप लगावला लगावला आहे.
मुंगेर विधानसभा से जबरदस्ती राजद उम्मीदवार के पोस्टल बैलेट को रद्द किया जा रहा है और चार EVM की गणना ही नहीं की जा रही है।
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 10, 2020
राजदच्या अधिकृत ट्विटर खात्यावर लोकशाहीमध्ये ही लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही देण्यात आलाय. ही तक्रार घेऊन राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं असल्याचीही माहिती मिळत आहे.