मुंबई – अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर ‘बवाल’ या चित्रटामुळे चर्चेत आले आहे. नुकताच त्यांचा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदच एकत्र काम करणाऱ्या वरूण आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जान्हवीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
इनस्टाग्रामवर वरूणसोबतचा एक फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले की, “तुमचे प्रेम #बवाल झाले आहे. निशाला स्वतःसाठी, अज्जूला सुधारण्यासाठी, आमच्या कथेला आणि कामाला प्रेम डीलर त्याबद्दल धन्यवाद. या शर्यतीत एक धारणा निर्माण करण्यासाठी, काही गोष्टींसाठी स्पर्धा करण्यासाठी आणि काही व्हॅलिडेशन गमावले आहे. काहीवेळा आपल्याला सर्वात मोठी समस्या वाटते ती म्हणजे केवळ आपले मन आपल्याला आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची किंमत मोजू देत नाही.
इतिहासाच्या कालखंडात अनेकांना अमानुष संकटांचा सामना करावा लागला. आपल्या समस्या क्षुल्लक आहेत, तुमच्याकडे काय आहे हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही काय आहात हे महत्त्वाचे आहे, कधी कधी आपण साध्या साध्या गोष्टींना गमावून बसेपर्यंत त्याची किंमत विसरतो, तेव्हाच हे लक्षात येते की खर्या आनंदाचा हाच आमचा धमाका होता. आमचा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांना ही फिलिंग येईल.”
View this post on Instagram
दरम्यान, बावलमध्ये वरुण धवन इतिहास शिक्षक अजयची भूमिका साकारत आहे आणि जान्हवीने त्याची पत्नी निशाची भूमिका केली आहे.या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून खुप कौतुक करण्यात आले आहे. बावलनंतर अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘दोस्ताना 2′ आणि ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.