पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील ‘लवकरच एक तारीख ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय’. अशी हाक दिली आहे. आणि त्याच मुळे आता राज्यपालांना लवकरात-लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागलू आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, सर्वच स्तरातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे. अश्यातच पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. येत्या 8 तारखेला हा बंद पुकारण्यात येणार आहे. एका प्रसिद्ध वृतसंस्थने याबद्दल माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये विविध संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.
कोश्यारींचं विधान काय होत…!
एका कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले होते.., ‘तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील’, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होत.