वाघोली (पुणे) – जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके फोडणे व रॅली काढण्यावर बंदी घातली आहे, तरीदेखील भावडीमध्ये विजयी उमेदवार व ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला.
याप्रकरणी रमेश भामगर, बिरादेव श्रीराम, महेश कदम, राहुल चव्हाण, सोमनाथ तांबे व इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.