वालचंदनगर -गेल्या 10 वर्षांपासून यशाची परंपरा राखणाऱ्या वालचंदनगर कंपनीच्या भारत चिल्ड्रेन्स ऍकॅडमी (बीसीए)चा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम तीन क्रमांक – अपेक्षा भोसले (97), मोनिका कांबळे (95.40), साक्षी कवडे (95) यांनी यश मिळविले. परीक्षेत 207 विद्यार्थी बसले होते. यापैकी 207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तावशी व म्हसोबाची वाडी 100 टक्के यशस्वी
निमसाखर -इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेच्या तावशी व म्हसोबाची वाडी दोन्ही माध्यमिक विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तावशी शाळेने सलग चार वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा राखली आहे.
तावशी माध्यमिक विद्यालयात वैष्णवी राऊत (94.60), अभिषेक माने (84.60), सुप्रिया माने (84.20) यांनी यश संपादन केले. म्हसोबाची वाडी येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. प्राची कवडे व अंकिता धवडे (83.80) प्राची चव्हाण (79) वैष्णवी पवार व कीर्ती दाभाडे (78.40).
कदम विद्यालय
रेडा -रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयचा निकाल 89.10 टक्के लागला. यावर्षी पहिल्यांदाच दहावी परीक्षा केंद्र विद्यालयास देण्यात आले होते. मानसी चोरमले (95.60), आशिष फडतरे (95), राधिका जाधव (87) यांनी यश मिळविले. एकूण 101 परीक्षार्थींपैकी 90 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी अठरा विद्यार्थी विशेष प्रावीण्य, तर 37 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
श्री वर्धमान विद्यालय
वालचंदनगर -येथील श्री वर्धमान विद्यालयाचा निकाल 94.55 टक्के लागला आहे. परीक्षेसाठी 202 विद्यार्थी बसले होते. यापैकी 191 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तेजस बर्गे (95.80), शिवानी सोलनकर (94.80), मायावती चोरमले (94.40) यांनी यश मिळविले.
एसपीएन हायस्कूल
अकलूज -खंडाळी (ता. माळशिरस) येथील ज्ञानगंगा बालविकास मंडळ खंडाळी संचलित श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कुलचा निकाल 94.80 टक्के लागला. या परीक्षेमध्ये कोमल पवार (90.60), सागर लोहोकरे (89) तृतीय संजना शशिकांत गोसावी (88.20) यांनी बाजी मारली आहे.
सावतामाळी विद्यालय
अकलूज -माळेवाडी येथील सावतामाळी विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. एकूण 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. श्रुतिका एकतपुरे (90.40), प्राजक्ता काळे (88), पवन जाधव (87.60) यांनी यश मिळवले.