ढाका – बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या ( BAN vs IND ) एकदिवसीय सामन्यात भारतीय संघासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अत्यंत महत्वाचा आहे. यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो फलंदाजीला मैदानात उतरणार की नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण झालाय.
BANvsIND | बांगलादेशचे टीम इंडियासमोर २७२ धावांचे लक्ष्य; मेहदी हसनची शतकीय खेळी
यजमान संघाच्या २७१ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून शिखर धवन आणि विराट कोहली सलामीला मैदानात उतरले होते. रोहितच्या फलंदाजीत खेळण्याबाबत प्रश्न निर्माण झाल्याने विराट आणि धवन यांना संघाची फलंदाजीतील जबाबदारी सांभाळायची होती. मात्र ते दोघेही पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. पहिल्यांदा विराट कोहली ५ धावा आणि त्यानंतर शिखर धवन ८ धावा करून बाद झाले. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
BANvsIND | बांगलादेशचे टीम इंडियासमोर २७२ धावांचे लक्ष्य; मेहदी हसनची शतकीय खेळी
सध्या श्रेयस अय्यर १२ धावा आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर फलंदाजी करत असून संघाची धावसंख्या ३५ धावांवर २ गडी बाद अशी आहे. यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पहिली तर रोहितच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर केएल राहुल हा एकमेव फलंदाज संघाकडे आहे. त्यानंतर अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर यांचा क्रमांक आहे.
भारतीय संघाला आता शेऱ्यास अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल यांच्याकडून चांगल्या खेळीच्या अपेक्षा असणार आहेत. भारतीय संघाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजचा विजय गरजेचा आहे. भारताने सामना गमावल्यास यजमान बांगलादेश मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेईल.