चिंबळी, (वार्ताहर) – ज्वारी पिकाची काढणीकरून झाल्यावर कडबा पावसाने भिजू नये व तो पावसाळ्यात चारा म्हणून जनावरांना उपयोगी पडावा याकरिता वळई (गंज) रचण्याच्या कामाची लगबग खेडच्या दक्षिण भागतील बळीराजाकडून सुरू आहे.
चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ भागातील शेतकर्यांनी गेल्या चार महिन्यांपापूर्वी रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या ज्वारी पिकाची काढणी व कणसाची कापणी करून उन्हात वाळून मळणी केलेल्या कडब्याच्या पेंड्या बांधून त्या गोळा करून टॅक्टरमधून वाहून घराजवळ आणून वळई रचणे अशी कामे वेगात सुरू आहेत.
विशिष्ट म्हणजे लांबी रुंदीने वळईत कडबा रचला जातो वळईची लांबी 50 फुटांपर्यंत तर उंची व 13 फूट इतकी असते. एका मोठ्या वळईमध्ये किमान मोठ्या बांध्याच्या 6 हजारापर्यंत कडबा पेंड्या बसतात. प्रत्येक वळई उंचावर निमुळती असते त्यामुळे पावसाचे पाणी वरून खाली ओंघळत येते व पाण्यामुळे आतील भागाचा कडबा भिजत नाही व खराब होत नाही. तसेच वार्याने उडून जात नाही इतकी वळई दाबून रचली जाते. वर्षभर जनावरांना खाद्य म्हणून या वळईतील कडब्याचा वापर होतो