वाल्हे, (वार्ताहर) – यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, गायी-गुरे, शेळीमेंढी यांसह मनुष्यामागे साधारण रोगराई राहील. हत्तीचे पाणी तीन खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. वेळेत पेरणी करणार्या शेतकर्याला सव्वास सव्वाशेर मिळणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.
आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि. 25) उत्तर पौर्णिमा धूलिवंदन व तानाजी बाबा यांच्या यात्रेनिमित्त देवाची भाकणूक (भविष्यवाणी) व गजे गोपाळ (जेवणावळी) झाली. मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत तानाजी बाबांचं चांगभलंच्या जयघोष करत भाकणूक झाली. तानाजी बाबा यात्रा व उत्तर पौर्णिमेनिमित्त पहाटे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व देवी जोगेश्वरी व तानाजीबाबा यांची महापूजा करण्यात आली.
सकाळपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मानकर्यांच्या वतीने देवाला पोशाख घालण्यात आला. त्यानंतर देवाची धुपारती झाल्यावर देवाचे मानकरी शंकर पवार व निवृत्ती भुजबळ यांनी भविष्यवाणी सांगितली. भाकणूक झाल्यावर उत्सवमूर्तीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर छबिन्याची सांगता झाली.
यावेळी, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, वाल्हे माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, बजरंग पवार, सागर भुजबळ, शकंर पवार,भाऊसाहेब पवार, संभाजी पवार, मुरलीधर पवार, अरविंद पवार, महेंद्र शिर्के, चंद्रकांत शिर्के, दादासाहेब गायकवाड, राहुल भुजबळ, नामदेव शिर्के, हिम्मत शिर्के, गेनबा पवार आदींसह वाल्हे व पंचक्रोशीतील अनेक नाथ भाविक भक्त उपस्थित होते.