पुणे – वेगवेगळी कारणे सांगून राज्यातील शेतकऱ्यांना ऐन खरिपात पीककर्ज देण्यास बॅंकांनी टाळाटाळ चालवली आहे. विशेषतः राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कामकाजावर राज्य मुख्य सचिवांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
करोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या सत्रामुळे कृषी पतपुरवठ्याच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. अशावेळी जिल्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या हंगामात राष्ट्रीयकृत ँकांनी राज्यातील शेतकऱ्यांना टार्गेटच्या केवळ 48 टक्के कर्ज दिले आहे. मुख्य सचिवांना ही बा आवडलेली नाही. विशेषतः राष्ट्रीयीकृत ँका कर्ज देण्यात यंदा देखील पिछाडीवर असल्याद्दल मुख्य सचिवांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिछाडीवर गेलेला कृषी पतपुरवठा ही राज्याच्या दृष्टीने चिंतेची ा असल्याचे मुख्य सचिवांनी बॅंकांच्या प्रतिनिधींना भर बैठकीतच सांगितले आहे.
जिल्हा बॅंकेकडून आतापर्यंत 56% पीककर्ज
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी बजावली आहे. या बॅंकेला सन 2020-21 मध्ये 1,653 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर बॅंकेने आतापर्यंत 939 कोटी कर्जाचे वाटप केले आहे. ही आकडेवारी 56.83 एवढी आहे. तर गतवर्षी 950 कोटींचे 66 टक्के पीककर्जवाटप केले होते.