नवी दिल्ली – करोनामुळे जगभरातील क्रिकेट ठप्प झाले आहे. अशा स्थितीत आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आता करोनामुळे झालेले नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने (सीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) 4 नव्हे तर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता टी-20 विश्वकरंडक स्पर्धेवर देखील करोनाचे सावट निर्माण झाले आहे. ही स्पर्धा होणार का पुढे ढकलली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला असला तरीही जर करोना नियंत्रणात आला व स्पर्धा झाली तर त्यानंतरची कसोटी मालिका देखील ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल असे व्यक्त करत हा प्रस्ताव देण्यात आला आहे.