मुंबई – राज्यातील हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी एका महिलेने विधान भवनाच्या मुख्य द्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ही घटना घडत असतानाच पोलीसांनी पुढे येत त्या महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव राजलक्ष्मी असून ती नाशिक येथील युवा स्वाभिमान पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष आहे. त्यांच्या कुटुंबावर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला असल्याचा त्यांचा आरोप आहे. वारंवार याविषयी बोलूनही दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आता सध्या त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.