रोहतक- ३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बोगद्याचे उद्घाटन केलं होतं. हा जगातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं तब्बल ४६ किमी एवढं अंतर कमी झालं आहे. मात्र याच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी ३ अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
बोगदा चालू झाल्यापासून निष्काळजीपणे वाहने चालवणे, असभ्य गोष्टी करणे, अतिशय वेगाने वाहने चालवणे अशी उदाहरणं देखील दिसत असल्याचं बीआरओने सांगितलं आहेलोक आतमध्ये जाऊन सेल्फी घेत आहेत, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत, असं बीआरओच्या मुख्य अभियंत्यांनी सांगितलं आहे. याबाबत पोलिस तैनात करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.
मनालीपासून सुरु असणारा हा बोगदा लेहपर्यंत जाणार आहे. ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. हा जगातील सर्वाच उंच बोगदाआहे.