मुंबई – देशातील महत्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल पुढे येत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. दरम्यान, या पूर्वीच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
अतुल भातखळकर –
‘हिजाब’ तापवून विरोधकांच्या पदरात निराशाच पडलेली दिसतेय…
चप्पा चप्पा भाजपा…#BJPWinningUP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2022
गिरीश महाजन –
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेशच्या सुरुवातीच्या कलांवर आपली प्रतिक्रिया देताना,”उत्तर प्रदेश ‘झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है” म्हणले आहेत. तसेच ठाकरे सरकारला इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असेही म्हटले आहे.
सतेज पाटील –
“पंजाबमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण आम्हाला अपेक्षित संख्याबळ मिळाले नाही. त्याबद्दल आत्मपरीक्षण करायला हवे. गोव्यात काँग्रेस १६-१७ जागांवर आघाडीवर आहे, तो सर्वात मोठा पक्ष असेल आणि संख्याबळ पुरेसं नसेल तर आम्ही दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा घेऊ,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
We expected Congress to form govt in Punjab, but we didn’t get required numbers. We have to introspect about it. In Goa, Congress is leading on 16-17 seats, it’ll be the single largest party & we’ll seek support in case numbers aren’t enough: Maha min & Cong leader Satej Patil pic.twitter.com/8ficWAw6JA
— ANI (@ANI) March 10, 2022
संजय राऊत –
खिचडी बहोत जगह बन सकती है. मतमोजणी पूर्ण झाली अजून, लोकांना नोटाला का मतं द्यावीशी वाटतायत हा प्रश्न सर्वच राजकीय लोकांनी करण्याची गरज आहे. आम्ही पूर्ण काम केलं होतं. उत्तर प्रदेश, गोव्यात आम्ही प्रयत्न केलेत. आदित्य जी देखील आले होते प्रचाराला. ही सुरुवात आहे. आधी धडपड करावी लागते आणि ती आम्ही केली. आता आम्ही थांबणार नाही.
आता लोकसभा लढू. सुरुवात केली आहे. प्रमोद सावंत यांच्याविषयी नाराजी होती. आम्ही आदित्य ठाकरेंची सभा देखील तिकडे घेतली होती. मात्र, आता अजून चित्र स्पष्ट व्हायला २ वाजतील. बघू काय होते. गोव्यात मागील सारखी परिस्थिती नाही ओढवणार, चिदंबरमांचा मला फोन आलेला. माझं बोलणं झालं. ते गोव्यात आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करु. असे राऊत यावेळी म्हणाले.
रोहित पवार –
“उत्तर प्रदेशच्या निवडणूकचा प्रभाव महाराष्ट्र पडत नाही,”असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच या निवडुकीपेक्षा महाराष्ट्रतील निवडणुकीचा आणि राज्यातील घडामोडींचा प्रभाव देशावर पडतो. नवीन तंत्रज्ञान आणि युवकांना उमेदवारी देण्याचा प्रमाण वाढवायला पाहिजे, असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
नितेश राणे –
उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. “गोवा आणि युपीत ‘म्याव म्याव’ चा आवाज ऐकू आला नाही भाई, किती वाईट, मला फार दु:ख झालं,” असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या –
Uddhav Thackeray SAHEB, Aditya Thackeray ji & Respected Sanjay Raut ji WHERE is Shivsena in GOA !!??
उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे जी आणि आदरणीय संजय राऊत जी गोव्यात शिवसेना कुठे आहे!!?? @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 10, 2022
गिरीश महाजन –
“शिवसेना पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आली आणि मुख्यमंत्री बसवला. नुसती तोंडाची बडबड करण्याशिवाय यांना काय जमतं. पुढच्या निवडणुकीत दोन खासदार आणि २० आमदार निवडून आणून दाखवा,” असं आव्हान गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं. आता, संपूर्ण देश भाजपामय, मोदीमय झाला आहे. मोदी जगमान्य नेते असून त्यांच्या नेतृत्वावर जनता विश्वास दाखवत आहे,” असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.